परिक्रमा पुर्ण होण्यास १३९ दिवस लागले,प्रत्येक दिवस निराळा होता.प्रथम मी एकटीनेच २५/१०/२०१२ला अमरकन्टक येथुन सुरवात केली,नाशिकहुन हावडामेलने २३/१० ला निघाले दुसर्यादिवशी दसरा होता,नागपुरला धम्मचक्रप्रवर्तन दिनाच्या सोहळ्यासाठी जाणार्यान्ची प्रचन्ड गर्दी होती रिझर्वेशनचा काहिही उपयोग नव्हता,नागपुरला सर्व गर्दी उतरली जागा झाली.रात्री दोन वाजता विलासपुरला उतरले अमरकन्टकसाठी पेड्रारोडला जाणारी रेल्वे सकाळी सहा वाजता होती,मैय्याच्या मदतीचा अनुभव येण्यास सुरुवात झाली,अमरकन्टकला राहणारा गोन्दियाला नोकरी करणारा तरुण राम भेटला त्यानेच तिकीट काढुन माझे सामानही गाडीत ठेवले,पेड्रारोडला उतरल्यावर जीपमध्येही ठेवले सकाळी नवुवाजता अमरकन्टकला पोहोचले.२०११/१२च्या पहिल्या परिक्रमेत श्री भजनान्दस्वामी ट्रस्ट्च्या म्रुत्युन्जय आश्रमात आम्ही उतरलो होतो मी तेव्हा आजारी होते,आश्रमातील स्वामी हरिहरानन्द यानी आणि सेवेकर्यानी माझी तेव्हा खुप काळजी घेतली होती म्हणून तिथेच गेले माझे छान स्वागत झाले.
नर्मदाकुन्डावर जावून सन्कल्पा विशयी चौकशी करुन सर्व ठरवले. सन्ध्याकाळी मैय्याच्या घाटावर दसरा सोहळा,रावणदहन कार्यक्रमाचा आनन्द लुटला.इकडे सोने लुटण्याची पध्द्त दिसली नाही.
दुसर्या दिवशी २५/१०/२०१२ला एकादशी होती गुरुजीनी सकाळी ८वाजता बोलवले होते.पहाटे आश्रमाच्या समोरील मैय्याच्या घाटावर स्नानासाठी गेले,भ्रमनिरास झाला,दसरामेळावा सम्पला होता पण घाणीचे साम्राज्य पसरले होते,मैय्याची क्षमा मागुन पुन्हा खोलीवर आले आणि स्नान केले.
महाराज्न्चा आशिर्वाद घेतला त्यानी आशिर्वादाबरोबर चहाही दिला,सामान पाठीला लावले आणि लक्षात आले काठी काल जीपमध्येच विसरली पण मैय्या कसलीच अडचण येऊ देत नाही,एका सेवेकर्याने काठी दिली,नर्मदे हर! नर्मदाकुन्डावर गेले एकादशी असल्याने प्रचन्ड गर्दी होती.कशीतरी गुरुजीन्जवळ पोहोचले त्यानी मला ओळखलेच नाही कालच सन्कल्पासाठी,कढईसाठी पैसे दिल्याची त्याना आठवण करून दिली तेव्हा त्यानी एकाला बोलावुन मला सन्कल्प सान्गण्यास सान्गितले,गोमुखातून नर्मदाजल एका कुपीत भरुन घेण्यासाठी गेले,घाणीचे साम्राज्य पाहुन मन खुप उदास झाले.मैय्या! तुझी थोरवी जाणण्याची आमची लायकीच नाही क्षमा कर अशी प्रार्थना करुन कुपीत जल भरुन घेतले.पुन्हा मन्दिरात आले,त्या सन्कल्प सान्गणार्या गुरुजीनी मला गोत्र विचारले आणि मला सन्स्क्रुत काय कळणार या विचाराने असेल बहुतेक महाम्रुत्युन्जय मन्त्र म्हणून सन्कल्प झाला असे म्हणुन दक्षिणा मागितली,मी पुन्हा मैय्याची क्षमा मागितली आणि मनोमनी परिक्रमेचा सन्कल्प केला.दक्षिणा दिली,गुरुजीन्कडे गेले कढईबद्दल विचारले,ते म्हणाले सवडीने आम्ही कढई करू.नर्मदे हर!मैय्यासाठी आणलेली साडी,शन्करासाठी आणलेली शाल गुरुजीना देउन मी मैय्याची वारन्वार क्षमा मागत दक्षिण दरवाजाने बाहेर पडून दक्षिणतटावरुन वाटचाल सुरु केली.
७कि.मि. कबीरचबुतरा गेले,दाट जन्गलाच्या मधुन छान डाम्बरी रस्ता आहे.नुकताच पावसाळा सम्पला असल्याने सारे रान हिरवी दुलई पान्घरुन पहुडले आहे त्या दुलईवर रन्गीबेरन्गी फुलान्ची नक्षी शोभते आहे.रस्त्याच्या दोन्ही बाजुना माकडे बसुन माकडचेस्टा करत होती.आणि ह्या निसर्गाच्या सोबतीने मी ओम नमो नर्मदा माई रेवा पार्वतीवल्लभ सदाशिवा असा जप मनात करत वाटचाल करत होते.हातातील काठी भलीमोठी होती,माझ्या हातात ती जेमतेमच मावत होती अवघडच होते सारे माझी छान काठी मी हरवली होती पण काठीतर हवीच.मैय्याला माझी अडचण कशी सहन होणार?तिने भुरा नावाच्या आदिवासी बन्धुला पाठवले,ते म्हणाले मैय्या तेरे हाथने भारी लाठी है ये लेके कैसे चलोगी? मेरी लाठी हल्की है ये लेलो,चलनेमे आसानी होगी.त्याना प्रणाम करुन मी ती काठी घेतली पुढे वाटचाल सुरु.
रस्त्याने भेटणारे थाम्बत,विचारत,माताराम अकेली चल रही हो? किसिके साथ चलो.मी उत्तर देत असे,अकेली नही मैय्या है साथमे,आप लोग हो.पण मनातमात्र चलबिचल होत असे.सकाळी कबीरचबुतराला नास्ता केला होता दुपारी भोजनाची सोय झाली नव्हती.जगतपुरला आन्गण्वाडीच्या पडवीत बसून बिस्किटे खाल्ली,पुन्हा पुढे.मधे मधे थाम्बत सन्ध्याकाळी करन्जियाला पोहोचले तेव्हा ५ वाजले होते.मुक्काम कुठे करायचा हा विचार मला करण्याची गरजच नव्हती मैय्याने ती सोय श्री.प्रेमकुमार बुनकर या रिटायर्ड मलेरिया इन्स्पेक्टर यान्च्याकडे केलेली होती.
बुनकर यान्च्या बद्दल सान्गायचे झाले तर एका अपघातात त्यान्च्या उजवा पाय गुढग्याच्यावर कापलेला आहे.त्यानी तीनचाकी स्कुटरला छप्पर करुन घेतले आहे,सामानासाठी जागा,पत्नीला बसण्यासाठी सीट करुन घेतली आहे.आणि या जोडप्याने ह्या गाडीवरुन नर्मदापरिक्रमा केली आहे तीही बावनगजामार्गे शुलपाणिच्या जन्गल मार्गाने.
उद्या पुढे परिक्रमा मार्गाने वाटचाल करुया.
नर्मदाकुन्डावर जावून सन्कल्पा विशयी चौकशी करुन सर्व ठरवले. सन्ध्याकाळी मैय्याच्या घाटावर दसरा सोहळा,रावणदहन कार्यक्रमाचा आनन्द लुटला.इकडे सोने लुटण्याची पध्द्त दिसली नाही.
दुसर्या दिवशी २५/१०/२०१२ला एकादशी होती गुरुजीनी सकाळी ८वाजता बोलवले होते.पहाटे आश्रमाच्या समोरील मैय्याच्या घाटावर स्नानासाठी गेले,भ्रमनिरास झाला,दसरामेळावा सम्पला होता पण घाणीचे साम्राज्य पसरले होते,मैय्याची क्षमा मागुन पुन्हा खोलीवर आले आणि स्नान केले.
महाराज्न्चा आशिर्वाद घेतला त्यानी आशिर्वादाबरोबर चहाही दिला,सामान पाठीला लावले आणि लक्षात आले काठी काल जीपमध्येच विसरली पण मैय्या कसलीच अडचण येऊ देत नाही,एका सेवेकर्याने काठी दिली,नर्मदे हर! नर्मदाकुन्डावर गेले एकादशी असल्याने प्रचन्ड गर्दी होती.कशीतरी गुरुजीन्जवळ पोहोचले त्यानी मला ओळखलेच नाही कालच सन्कल्पासाठी,कढईसाठी पैसे दिल्याची त्याना आठवण करून दिली तेव्हा त्यानी एकाला बोलावुन मला सन्कल्प सान्गण्यास सान्गितले,गोमुखातून नर्मदाजल एका कुपीत भरुन घेण्यासाठी गेले,घाणीचे साम्राज्य पाहुन मन खुप उदास झाले.मैय्या! तुझी थोरवी जाणण्याची आमची लायकीच नाही क्षमा कर अशी प्रार्थना करुन कुपीत जल भरुन घेतले.पुन्हा मन्दिरात आले,त्या सन्कल्प सान्गणार्या गुरुजीनी मला गोत्र विचारले आणि मला सन्स्क्रुत काय कळणार या विचाराने असेल बहुतेक महाम्रुत्युन्जय मन्त्र म्हणून सन्कल्प झाला असे म्हणुन दक्षिणा मागितली,मी पुन्हा मैय्याची क्षमा मागितली आणि मनोमनी परिक्रमेचा सन्कल्प केला.दक्षिणा दिली,गुरुजीन्कडे गेले कढईबद्दल विचारले,ते म्हणाले सवडीने आम्ही कढई करू.नर्मदे हर!मैय्यासाठी आणलेली साडी,शन्करासाठी आणलेली शाल गुरुजीना देउन मी मैय्याची वारन्वार क्षमा मागत दक्षिण दरवाजाने बाहेर पडून दक्षिणतटावरुन वाटचाल सुरु केली.
७कि.मि. कबीरचबुतरा गेले,दाट जन्गलाच्या मधुन छान डाम्बरी रस्ता आहे.नुकताच पावसाळा सम्पला असल्याने सारे रान हिरवी दुलई पान्घरुन पहुडले आहे त्या दुलईवर रन्गीबेरन्गी फुलान्ची नक्षी शोभते आहे.रस्त्याच्या दोन्ही बाजुना माकडे बसुन माकडचेस्टा करत होती.आणि ह्या निसर्गाच्या सोबतीने मी ओम नमो नर्मदा माई रेवा पार्वतीवल्लभ सदाशिवा असा जप मनात करत वाटचाल करत होते.हातातील काठी भलीमोठी होती,माझ्या हातात ती जेमतेमच मावत होती अवघडच होते सारे माझी छान काठी मी हरवली होती पण काठीतर हवीच.मैय्याला माझी अडचण कशी सहन होणार?तिने भुरा नावाच्या आदिवासी बन्धुला पाठवले,ते म्हणाले मैय्या तेरे हाथने भारी लाठी है ये लेके कैसे चलोगी? मेरी लाठी हल्की है ये लेलो,चलनेमे आसानी होगी.त्याना प्रणाम करुन मी ती काठी घेतली पुढे वाटचाल सुरु.
रस्त्याने भेटणारे थाम्बत,विचारत,माताराम अकेली चल रही हो? किसिके साथ चलो.मी उत्तर देत असे,अकेली नही मैय्या है साथमे,आप लोग हो.पण मनातमात्र चलबिचल होत असे.सकाळी कबीरचबुतराला नास्ता केला होता दुपारी भोजनाची सोय झाली नव्हती.जगतपुरला आन्गण्वाडीच्या पडवीत बसून बिस्किटे खाल्ली,पुन्हा पुढे.मधे मधे थाम्बत सन्ध्याकाळी करन्जियाला पोहोचले तेव्हा ५ वाजले होते.मुक्काम कुठे करायचा हा विचार मला करण्याची गरजच नव्हती मैय्याने ती सोय श्री.प्रेमकुमार बुनकर या रिटायर्ड मलेरिया इन्स्पेक्टर यान्च्याकडे केलेली होती.
बुनकर यान्च्या बद्दल सान्गायचे झाले तर एका अपघातात त्यान्च्या उजवा पाय गुढग्याच्यावर कापलेला आहे.त्यानी तीनचाकी स्कुटरला छप्पर करुन घेतले आहे,सामानासाठी जागा,पत्नीला बसण्यासाठी सीट करुन घेतली आहे.आणि या जोडप्याने ह्या गाडीवरुन नर्मदापरिक्रमा केली आहे तीही बावनगजामार्गे शुलपाणिच्या जन्गल मार्गाने.
उद्या पुढे परिक्रमा मार्गाने वाटचाल करुया.
तीर्थजननी नर्मदा परिक्रमा.मझे अनुभव.
ReplyDeleteplz continue
ReplyDelete